Translate

Wednesday, October 31, 2018

#दिवाळी अणि फटाके





"फक्त दिवाळीतचं  फटाके उडविली जातात असे नाही अणि प्रदुषण फक्त फटाक्यांमुळेच होते असेही नाही जरी असे  असले तरी दिवाळीतील  फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत होणारी  वाढ ही लक्षणीय असते हे कोणीही नाकरणार नाही, त्यामुळे फटाक्यांचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे"


दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, दिवाळी म्हणजे  फरळाचा गोड़वा अणि दिवाळी म्हणजे फटाके.  दिवाळीचे हेच  चित्र जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ऊभं  राहतं  भारतामध्ये प्राचीन काळापासून दिवाळी साजरी केलि जाते पण  दिवाळी अणि फटाके यांच नातं   मात्र तेवढे प्राचीन नाही. फटाक्यांचा शोध ११ व्या  शतकात चीन मध्ये लागला अणि भारतामध्ये १४व्या  शतकाच्या दरम्यान त्यांचा वापर सुरु झाला पण दिवाळीमध्ये  फटाक्यांचा वापर नक्की कधीपासून सुरु केला गेला याची माहिती उपलब्ध नाही.
         दिवाळी अणि फटाके यांच्यातील  नातं  मागील काही  दशकांमध्ये अधिक  दॄढ झाल्याचे जाणवते. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे होणारी हानी ही आधीही होतचं होती पण आता तीची तीव्रता वाढत चालली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे  निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अणि स्वताचे जीवन अधिक आरामदायी बनविण्यासाठी  माणसाने निसर्गाचा समतोल बिघडवून टाकला  आहे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासांची जाणीव अधिक तीव्र होत  चालली आहे त्यामुळेच  दिवाळी अणि फटाके यावरून लोकं दोन  गटात विभाजीत होताना दिसत आहेत, एक फटाक्यांच्या बाजूने तर दूसरे फटाक्यांच्या विरोधात. 
               फक्त दिवाळीतचं  फटाके उडविली जातात असे नाही अणि प्रदुषण फक्त फटाक्यांमुळेच होते असेही नाही जरी असे  असले तरी दिवाळीतील  फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत होणारी  वाढ ही लक्षणीय असते हे कोणीही नाकरणार नाही, त्यामुळे फटाक्यांचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अनधिकृत फटाक्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली पाहिजे, ठरवून दिलेल्या नियमानुसार फटाक्यांची खरेदी विक्री न करणाऱ्यांवर कड़क करवाई केली  गेली पाहिजे, बऱ्याच संघटना,शाळा, महाविद्यालये  यांनी या विषयासंदर्भात जनजागृति सुरु केली  आहे आणि बऱ्याच लोकांनी स्वतः होऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी  करायलाही सुरुवात केलि आहे  याची व्याप्ती वाढणे गरजेचे आहे. आपल्या घरातील दिवाळीच्या आनंदाचा प्रकाश  त्यांच्या पर्यंत पोहचवुया  ज्यांची दिवाळी अजूनही अंधारात होते, फटाक्यांच्या क्षणिक अनंदापेक्षा हा आनंद चिरकाल टिकणारा  असेल.
दैनिक लोकमत (५/११/२०१८)

                         फटाक्यांची आतिषबाजी म्हणजे दिवाळी ही मानसिकता बदलली पाहिजे संस्कृति, रूढ़ि, अणि  परंपरा यांच्याशी जो फटाक्यांचा संबंध  जोड़ला जातो तो योग्य नाही.  कालानुरूप जर बदल आत्मसात केले गेले तरच कोणतीही गोष्ट तीचे अस्तित्व टिकवून ठेवू शकते त्यामुळे कालसुसंगत नसलेल्या प्रथा परंपरा जर बदलल्या गेल्या नाहीत तर त्या नामशेष होतील.  भारतीय संस्कृति ही निसर्गाला समृद्ध बनविणारी  आहे त्यामुळे या संस्कृतीतील  सण उत्सवसुद्धा  आपल्याला निसर्गापासून दूर नेणारे नाहीत तर आनखीन जवळ नेणारेच असणार याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे निसर्ग असेल  तर माणसाचे अस्तित्व असेल, माणसाचे अस्तित्व असेल तर धर्म सण उत्सव असतील त्यामुळे पुढील पीढीने उत्सव साजरे करायचे असतील तर निसर्गाची हानी टाळून त्याचे समृद्धीकरण करणे क्रमप्राप्त आहे.
                        






                    

Saturday, October 27, 2018

#ग्लोबल वार्मिंग - एक जटिल जागतिक समस्या.





ग्लोबल वार्मिंगवरती उपाययोजना करून त्याची तीव्रता जर कमी नाही केली तर पृथ्वीचा विनाश हा अटळ आहे. त्यामुळे हे संकट कमी करण्याची पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे तर कर्त्यव्य आहे. ग्लोबल वार्मिंग वाढण्यामध्ये जसा प्रत्येकाचा वाटा आहे तसाच तो कमी करण्यासाठीही प्रत्येकाने हातभार हा लावलाच पाहिजे. वैद्यानिकांच्या आणि पर्यावरणवादींच्या मते ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाटी मुखत्वे क्लोरोफ्लोरो कार्बोनचे उत्सर्जन कमी करावे लागेल आणि त्यासाटी फ्रीज, एअर कंडीशनर आणि कुलिंगसाठी वापरल्या जाणार्या यंत्रांचा वापर कमी करावा लागेल ज्यातून हा वायू बाहेर पडतो.

            सध्या आपण सगळेच वाढत्या उन्हामुळे त्रस्त झालो आहोत, वरचेवर उन्हाळा आणखीनच असह्य होत चालला आहे. मागच्या काही वर्षापासून उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता वाढतच आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती, शेतकर्यांना करावे लागणारे स्थलांतरण, जनावरांची असहायता अशा गोष्टींमुळे उन्हाळ्याची भयानकता आणखीनच वाढत आहे त्याचबरोबर पावसाळ्यातील पावसाचे सातत्य ही कमी होत चालले आहे ज्यामुळे कधी अतिवृष्टी होते तर कधी अल्पवृष्टी या सगळ्या बदलांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चलला आहे आणि या सर्वांसाठी आपणच जबाबदार आहोत कारण प्रत्येक उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात आपण तीच तीच चर्चा करतो आणि विसरून जातो. हे सगळे बदल क होतात? त्याची करणे काय आहेत? त्यावर उपाय काय आहेत हे माहिती करण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. जर आपण तसा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल कि, एक भलंमोठं संकट आपल्या समोर उभं आहे. ज्याचं नाव आहे ग्लोबल वार्मिंग.
ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय?
         पृथ्वीच्या वातावरणात उष्णता साचून किंवा अडकून राहण्याची प्रक्रिया म्हणजे ग्रीन हॉउस ईफेकट. विशिष्ट प्रकारच्या गासेसमुळे ही प्रक्रिया घडते, सूर्यप्रकाश वातावरणात प्रवेश करतो, सूर्याकडून मिळणाऱ्या एकूण उर्जेपैकी एक तृतीयांश सौरुउर्जा वातावरणातून आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तत्काळ अवकाशात परत जाते, उर्वरित सौरऊर्जा पृथ्वीचा पृष्ठभाग शोषून घेतो आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वीला ऊब मिळते. पृथ्वी जेव्हा थंड होते तेव्हा ती शोषुन घेतालेली उष्णता वातावरण भेदून परत अवकाशात मिसळते. मात्र पृथ्वीची सर्वच उष्णता परत अवकाशात जात  नाही वातावरणात उपस्थित असलेले कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्ल्रोरो कार्बन  आणि पाण्याची वाफ हे सर्व घटक ही उष्णता अवकाशात जाण्यापासून रोखतात, त्यामुळे ही उष्णता पृथ्वीच्या वातावरणात अडकून पडते आणि परिणामी तापमान वाढते हेच आहे ‘ग्लोबल वार्मिंग’.

ग्लोबल वार्मिंगची कारणे?
    वाढत्या श्हारीकरणामुळे वाढत चाललेली जंगलतोड, अधुनुकीकरणासाठी, विकासासाठी आणि ऐशोरामासाठी होणारा उर्जेचा अतीवापर या गोष्टी ग्लोबल वार्मिंगसाठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ज्या वेगाने आपण उर्जेची निर्मिती करतोय त्यापेक्षा जास्त वेगाने आपण ती वापरतोय. कोळसा, नैसर्गिक वायू, कच्चे तेल यांची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. उर्जेचे स्त्रोत हे मर्यादित आहेत आणखीन ४० वर्षे उर्जेची निर्मिती करता येईल एवढेच इंधन आता बाकी आहे आपण जे उर्जास्त्रोत वापरत आहोत त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती शक्य नाही. मोठ्या प्रमाणावरील कोळसा व पेट्रोलचा वापर आणि त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली.
     घन कचरा, लाकूड तेल, नैसर्गिक गॅस  आणि कोळसा आदींच्या ज्वलनातून  कार्बनडाय ऑक्साईडची निर्मिती होते. जैविक कचरा सडला कि त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो. मिथेन वायू कार्बनडाय ऑक्साईड पेक्षा २० पट घातक आहेऔद्योगिक वसाहतीमधील अनेक प्रक्रीयामधून हा वायू वातावरणात सोडला जातो. क्लोरोफ्लोरो कार्बन हा वायू शीतपेटी(फ्रीज), वातानुकूलन(AC) इ. यंत्रांमधून बाहेर पडतो या वायुमुळे ओझोनचा थर विरळ होऊन साच्छिद्रता वाढण्याचा धोका आहे त्यामुळे सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर पोहचून मनुष्यास त्वचेचा कर्करोग तसेच जनुकीय बदल होतात आणि एकूण तापमानात वाढ होते

ग्लोबल वार्मिंगचे परिणाम
     १९५८ सालापासून ते आजपर्यंत वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडच्या प्रमाणात जवळजवळ ६८ टक्क्यांनी वाढ झाली असून भविष्यकाळात त्यात अधिक वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे पृथ्वीचे तापमान ३-४० अंशाने वाढेल. शेतीवर अनिष्ठ परिणाम होऊन धान्य सामग्री आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक आवश्यक उत्पादनात घट होईल.
       ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून सागरजल पातळी वाढल्याने किनार्यांचा काही भाग, शेते जलमय होतील. मुंबई, चेन्नई, नुयोर्क, लंडन, टोकियो, फ्लोरिडा व कोलकत्ता या शहरांचा पुष्कळसा भाग समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे. एकीकडे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत आहे तर दुसरीकडे वाळवंटे पसरत चालली आहे, पावसाला ही अनियमित होत चालला आहे, कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ पडतो.

ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचे उपाय 
   वरील सर्व गोष्टींवरून ग्लोबल वार्मिंग हे आपल्यासमोरील किती मोठे संकट आहे हे लक्षात आलेच असेल, ग्लोबल वार्मिंगवरती उपाययोजना करून त्याची तीव्रता जर कमी नाही केली तर पृथ्वीचा विनाश हा अटळ आहे. त्यामुळे हे संकट कमी करण्याची पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे तर कर्त्यव्य आहे. ग्लोबल वार्मिंग वाढण्यामध्ये जसा प्रत्येकाचा वाटा आहे तसाच तो कमी करण्यासाठीही प्रत्येकाने हातभार हा लावलाच पाहिजे. वैद्यानिकांच्या आणि पर्यावरणवादींच्या मते ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाटी मुखत्वे क्लोरोफ्लोरो कार्बोनचे उत्सर्जन कमी करावे लागेल आणि त्यासाटी फ्रीज, एअर कंडीशनर आणि कुलिंगसाठी वापरल्या जाणार्या यंत्रांचा वापर कमी करावा लागेल ज्यातून हा वायू बाहेर पडतो.
औद्योगिक कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर आणि वाहनामधून बाहेर पडणारा धूर कार्बनडाय ऑक्साईडचे  प्रमाण वाढवण्यासाठी मुखत्वे जबाबदार आहे त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कारखान्यांवरती कडक निर्बंध लावायला पाहिजे वाहनाच्या वापरावर आणि त्यातून बाहेर पडणार्या कार्बनडाय ऑक्साईडचवर मर्यादा घालून नियंत्रित करायला पाहिजे.
      सगळ्यात महत्वाचे म्हणजे जंगलतोड थांबवून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे झाडांची संख्या जर वाढली तरच या संकटाची तीव्रता कमी करता येईल.
   वरील उपायांकडे बघून असे वाटेल कि ही तर विकसित राष्ट्रांची, गव्हर्मेंटची, सरकारची जबाबदारी आहे एकट्याने काय होणार? पण प्रत्येकाने जर ठरविले कि शितयंत्राचा वापर गरजेनुपुरताच करेन, वाहनांसाठी कार्बनडाय ऑक्साईडची जी मर्यादा घालून दिलीय त्याचे पालन करेन, वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा जास्त वापर करेन, उर्जेचा अपव्यय  टाळून तिचा काटकसरीने वापर करेन, पारंपारिक (कोळशापासून जी वीजनिर्मिती होते) उर्जेचा वापर कमी करून अपारंपरिक उर्जेचा (सौरऊर्जा, पवनउर्जा, बयोगँस, जलविद्युत इ.) वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन, वृक्षतोडीला विरोध करेन, जास्तीत जास्त झाडे लावून ते जागवण्याचा प्रयत्न करेन,   तरच पृथ्वीला या संकटापासून वाचवता येईल आणि आणखीन समृद्ध बनवता येईल.

                               

#वासोटा - एक अविस्मरणीय जंगल ट्रेक.

View of vasota fort from boat

 या एकाच वाटेवर आम्हाला चार पाचशे फूट खोल पाण्यावरून जाणाऱ्या बोटीचा थरार, रक्त पिणाऱ्या जळवांच्या भागातून जतानाची भीती आणि  सुरक्षितपणे (हळद, मीठ आणि तंबाखूचे पाणी सोबत घेऊन) तेथून बाहेर पडण्याचा आनंद, प्राण्यांचा वावर असणाऱ्या घनदाट जंगलातुन किल्ल्यावर पोहचण्यासाठी लागणारे धाडस हे एकत्रितरित्या अनुभवता आलं यामुळेचं हा ट्रेक आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय असा होता.

           वासोट्याची पायवाट ही सर्व बाजूने डोंगरांनी वेढलेल्या  पाण्यातून सुरू होते पंधरा किलोमीटर पाण्यातून गेल्यानंतर ती जंगलातल्या पायवाटेला मिळते. जंगलातल्या या पायवाटेवर  रक्त पिणाऱ्या जळवांचा वावर असलेला भाग हा तीन ते चार किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे, त्यानंतर  झाडांच्या गर्दीतून नागमोडी वळणे घेत, मोठ मोठ्या दगड गोट्यातून उभी चढणं घेत ही वाट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचते, येथून पुढच्या वाटेवर घनदाट जंगलामुळे झाडांची डोक्यावर असलेली छत्री नाहीशी झाल्याचे तीव्रतेने जाणवते, तीव्र चढाईची थकवणारी  वाट  किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जाते.
  या एकाच वाटेवर आम्हाला चार पाचशे फूट खोल पाण्यावरून जाणाऱ्या बोटीचा थरार, रक्त पिणाऱ्या जळवांच्या भागातून जतानाची भीती आणि  सुरक्षितपणे (हळद, मीठ आणि तंबाखूचे पाणी सोबत घेऊन) तेथून बाहेर पडण्याचा आनंद, प्राण्यांचा वावर असणाऱ्या घनदाट जंगलातुन किल्ल्यावर पोहचण्यासाठी लागणारे धाडस हे एकत्रितरित्या अनुभवता आलं यामुळेचं हा ट्रेक आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय असा होता. ढगांशी स्पर्धा करणारी उंचच उंच डोंगरं, दूरच दूर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा त्यामधून  वाट काढणारं कोयनेचं पाणी, हिरव्या गर्द झाडीने व्यापलेली डोंगरांची जमीन असं हे किल्ल्यावरून दिसणारं मनमोहक दृश्य डोळ्यांचे पारणे फेडतात.
       १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला आणि व्याघ्रगड असे त्याचे नामकरण केले. किल्ल्यावरील वास्तूंची बरीच पडझड झाल्यामुळे मंदिर, राजवाडा, बुरुज इ. चे अवशेष दिसतात. किल्ल्यावर असणारं एकमेव बारमाही पाण्याचं टाकं बाबू कड्याकडे जाताना दिसतं यातलं पाणी पिण्यायोग्य आहे बाबुकड्यावरून दिलेल्या आवाजाचे तीन प्रतिध्वनी ऐकू येतात परतीचा प्रवास त्यामानाने कमी कष्टदायक होता. पहाटे पाचला सताऱ्यातून  सुरू झालेला आमचा प्रवास वासोट्याचा जंगल ट्रेक पूर्ण करून  संध्याकाळी पाच वाजता बामणोलीला संपला.हळू हळू सूर्य अस्तकडे चालला होता, सुर्यास्तावेळी पडणाऱ्या तांबड्या क्षितीजाच्या छटा पाण्यामध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. बामणोली येथे कॅम्पिंग करण्यासाठी जागा आहे गावात जेवणाची सोय पण होते आम्हीही येथेच टेंट उभा केला पाणी असलेल्या बाजूला टेंटचा दरवाजा केल्याने सुंदर असा नजारा टेंट मधून पाहता येत होता जेवण झाल्यानंतर शेकोटी पेटवली आणि ट्रेकच्या अविस्मरणीय आठवणीमध्ये सर्वजण  हरवून गेले आणि नंतर एक एक करत झोपी गेले.सिमेंटच्या जंगलापेक्षा या वातावरणात माझे मन जास्त रमते कारण सर्वाना सामावून घेणाऱ्या, सर्वाना सोबत घेणाऱ्या निसर्गाची दिव्यता आणि भव्यता येथे अनुभवता येते (या ट्रेकदारम्यान एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे माणसांचा हस्तक्षेप जिथे कमीत कमी असतो तेथील नैसर्गिक सुंदरता, साधन संपत्ती आणि जैवविविधता अबाधित राहते. या भागात माणसांचा वावर कमी असल्यामुळे विविध प्रकारची झाडे, वेली, पशु, पक्षी, कीटक आपलं अस्तित्व टिकवून आहेत. ते तसेच टिकून राहावं याची जबाबदारी येथे येणाऱ्या प्रत्येकाने घेतली पाहिजे)

starting point of vasota jungle trek