Translate

Sunday, June 9, 2019

#इंटरनेट ऑफ थिंग्ज (Iot)

                                                 


                                                        
           सकाळी झोपेतून उठल्यानंतर  रूममधील लाईट, फॅन /ऐसी  औटोमॅटिक बंद होतात, स्मार्ट अलार्म क्लॉक  गिझर चालू करण्यासाठी  सूचना  पाठवतो ,  इलेक्ट्रिक टूथब्रशने ब्रश केल्यानंतर  दातांची हेअल्थ कशी आहे याची माहिती डेंटिस्टला पाठवली जाते जर प्रॉब्लेम असेल तर डेंटिस्ट सोबतची अपॉइंटमेंट फिक्स केली जाते , अंघोळ झाल्यानंतर गिझर कॉफी मेकर आणि ओव्हन ला मेसेज पाठवतो  त्याप्रमाणे ते चालू होतात, जर फ्रिज मधील दूध, अंडे, फळे, भाज्या संपल्या असतील तर फ्रिज  याची  माहिती कळवतो  आणि त्या मागवून ही  घेतो, नाश्ता करून  कामाला  जाण्यासाठी  बाहेर निघाल्यानंतर  गाडीचा एसी ऑटोमॅटीक चालू होतो आवडती  गाणी किंवा बातम्या प्ले केल्या जातात, त्याचबरोबर गाडीची माहिती जसं पेट्रोल किती आहे, टायर, इंजिन आणि ब्रेक यांची काय स्थिती आहे हे   मोबाईलवर दिसेतं  आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तसा मेसेज गाडीच्या कंपनीला ही  पाठवला जातो त्याप्रमाणे सर्विसिंग कधी करायचं ते ठरवलं जातं , गाडीने जाताना ट्रॅफिक, एन्व्हायर्मेंट यांची उपडेट तुम्हाला मिळत राहते, तुम्हला जिथं पोचायचं आहे तिथं गाडीचं तुम्हला घेऊन जाते, आणि अचानक लक्षात येतं  कि घरातला एसी, लाईट बंद करायचा राहून गेलं तर लगेच आहे तिथुन बंद बंद केले जातात. हे कोणत्यातरी हॉलीवूडच्या सिनेमातील हिरोची एन्ट्री दाखवणारं कथानक किंवा संशोधकाची कल्पना आहे असं तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नाही. हे सर्व सत्य आहे आणि ज्यामुळे हे सर्व घडत आहे त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे इंटरनेट ऑफ थिंग्ज . याच तंत्रज्ञानाची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.  
          
          इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे अशा वस्तू ज्या इंटरनेटने एकमेकांना जोडता येतात. एमआयटी शास्त्रज्ञ केव्हिन अष्टोन यांनी १९९९ मध्ये प्रथमतः इंटरनेट ऑफ थिंग्जची संकल्पना मांडली. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यात स्वतंत्र ओळख (आयडी) असलेली यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल उपकरणे जी बंद आणि चालू करता येतात ती  इंटरनेटमार्फत मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय एकमेकांसोबत प्रत्यक्षदर्शी (रिअल-टाइम) माहितीचे आदानप्रदान करू शकतात. म्हणजेच वरती सांगितल्याप्रमाणे मोबाईल, स्मार्ट वॉच, फ्रिज, एसी, फॅन,टीव्ही, ओव्हन, कार यांसारखी अनेक उपकरणं  इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून  माहितीची देवाण करून अनेक टास्क परफॉर्म करू शकतात. कोणत्याही उपकरणाला आयपी ऍड्रेस देऊन(IP V-6) इंटरनेट सोबत जोडून त्याचा समावेश आयओटी मध्ये करता येतो. आयओटी मुळे मानवी जीवन ऑटोमॅटिक मोड मध्ये जगणं शक्य होत आहे.  
              
        आयओटी कसं काम करतं ते आता आपण बघूया, सेन्सर कडून जी माहिती मिळते ती सर्व माहिती आयओटीने जोडलेली उपकरणं इंटरनेटच्या माध्यमातून क्लाउडवर (व्हर्चुअल सर्व्हर) पाठवतात जिथे त्या माहितीवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रक्रिया करून कामाची माहिती वेगळी केली जाते आणि त्या माहितीच्या आधारावर  वेगवेगळ्या टास्क परफॉर्म करण्याची  सूचना आयओटी उपकरणांना दिल्या जातात. वेळेची बचत करणाऱ्या, उपकरणांच्या  कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या आणि कमी खर्चिक असणाऱ्या या तंत्रज्ञानातीला मुख्य अडथळा म्हणजे सुरक्षा, सर्व माहितीची देवाणघेवाण  इंटरनेटच्या माध्यमातून केली जात असल्यामुळे ती चोरी होण्याचा आणि तिचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मार्ट शहरांच्या विकासात इंटरनेट ऑफ थिंग्जची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात आयओटीमुळे शहरी जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत त्यामुळेच आयओटीशी जोडल्या जाणाऱ्या उपकरणांची संख्या झपाट्याने वाढत आहे, जवळपास सात बिलियन उपकरणं आतापर्यंत आयओटीशी जोडले गेलेत आणि पुढील काही वर्षातच संपूर्ण जग या तंत्रज्ञानाने व्यापून जाईल यात काही शंका नाही.
                                                                                         

Friday, June 7, 2019

#तंत्रशिक्षण आणि उपलब्ध संधी

     

  काही दिवसातच दहावीचे निकाल जाहीर होतील, निकाल लागताच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात  कुठलं शिक्षण क्षेत्र निवडायचं? कोणत्या क्षेत्रात नौकरीच्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत? कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचं यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित व्हायला सुरू होतात, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जर त्यांना मिळाली तरच ते योग्य तो निर्णय घेऊ शकतात, पण बऱ्याच वेळा पालक आणि विद्यार्थी ज्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून या प्रश्नांची उत्तरं मिळविण्याऐवजी ऐकीव व चुकीच्या माहितीच्या आधारे निर्णय घेतात ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. विद्यार्थी व पालकांचे चुकीच्या निर्णयामुळे होणारे नुकसान टाळणे आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यास उपयुक्त असे मार्गदर्शन करणे हाच या लेखाचा मुख्य उद्देश आहे.

तंत्र शिक्षणाला प्रचंड मागणी
 करिअरच्या विविध क्षेत्रांबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये चुकीच्या माहिती मुळे अनेक गैरसमज तयार झाले आहेत त्यापैकीच एक गैरसमज म्हणजे तंत्र शिक्षण या (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला आता वाव उरलेला नाही. एखाद्या अभ्यासक्रमाला वाव आहे किंवा नाही हे तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर  रोजगाराच्या संधी किती प्रमाणात उपलब्ध आहेत यावरून ठरविले जाते. त्यामुळे नौकरीची उपलब्धता सांगणाऱ्या ज्या सध्याच्या नामांकित वेबसाईट आहेत (जसं नौकरी.कॉम, सारकरिनौकारी.कॉम) त्याची आकडेवारी आणि तंत्रज्ञानावर आधारित काम करणाऱ्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत त्यांची मागच्या वर्षात झालेल्या भरतीची आकडेवारी पाहून डिप्लोमानंतर नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत की नाहीत याचं उत्तर प्रत्येकजण स्वतः मिळवू शकतात.

तंत्र शिक्षणाची माहिती
          नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत की नाहीत हे तर स्पष्ट झालं आता तंत्रशिक्षण या क्षेत्राची अधिक माहिती आपण करून घेऊ. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई हे विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि उद्योजक या गुणांना विकसित करणारे, इंजिनिअरिंगचे विविध विभाग, टेक्सटाईल आणि प्रिंटिंगशी संबंधित विविध ७० अभ्यासक्रम राबविते. या सर्व अभ्यासक्रमांना दहावी आणि बारावी वरून थेट प्रवेश दिला जातो  आणि पदविका अभ्यासक्रमानंतर इंजिनिअरिंगला थेट व्दितीय वर्षाला प्रवेश दिला जातो यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रवेश परीक्षेची गरज नाही. उद्योगांना आवश्यक असं कुशल मनुष्यबळ निर्माण  करण्यासाठी मंडळाकडून  दर चार ते पाच वर्षाला या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जातो.२०१७-१८ पासून आउटकम बेस्ड  एज्युकेशन(OBE) अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता यावर भर देणारा आय स्कीम हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे, या अभ्यासक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे मायक्रो प्रोजेक्ट तयार करणे  आणि सहा आठवड्याचे इंटर्नशिप (इंडस्ट्री मध्ये  प्रशिक्षण घेणं) करणे बंधनकारक आहे.या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आणि कल्पकतेला वाव मिळून रोजगाराच्या संधी मध्ये वाढ निर्माण होत आहे.    तंत्र शिक्षण हा फक्त रोजगाराच्या संधीच उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम आहे असे नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ज्ञान आणि बळ देणारा हा अभ्यासक्रम आहे, प्रात्यक्षिक ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर तसेच सर्वांगीण विकासावावर भर असल्याने सद्य परिस्थितीत उद्योगांकडून नौकरीसाठी पदविका अभ्यासक्रम पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात आहे.

गैरसमजुती
            तंत्र शिक्षणाच्या विशिष्ट अभ्यासक्रमलाच मागणी आहे आणि तंत्र शिक्षणला नेहमीच मागणी राहील असे नाही  अशा काही गैरसमजुती विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसून येतात. भारतासारख्या विकसनशील देशाला विकसित होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या कुशल मनुष्यबळाचीही तितकीच आवश्यकता आहे. जर भारताचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हे मनुष्यबळ एका विशिष्ट तंत्रज्ञानाशी संबंधित असून चालणार नाही तर ते  मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटर यांसारख्या सर्व तंत्रज्ञानाशी निगडित असणे गरजेचे आहे. घरांची, रस्त्यांची, कपड्यांची, वाहनांची, इलेक्ट्रिसिटीची, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माणसाला असणारी गरज ही कधीही न संपणारी आहे त्यामुळे तंत्र शिक्षणाची मागणी बंद होणं अशक्य आहे, जोपर्य तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे तोपर्यंत तंत्र शिक्षणाला मरण नाही.

उपलब्ध संधी
         तंत्र शिक्षण अभ्यासक्र पूर्ण केल्यानंतर रेल्वे,मेट्रो ट्रेन, बीएसएनएल, डीआरडीओ, इसरो,एचएएल, एमएससीबी, आकाशवाणी, प्रसारभारती, पर्यटन विभाग, पेट्रोलियम कंपन्या, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिलिटरी, नेव्ही, ऐरफोर्स यामध्ये सरकारी नौकरीच्या आणि अनेक खाजगी कंपन्यांसोबतच परदेशातही नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातही सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणात केला जात आहे त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला म्हणजे सगळं झालं असं नाही तर योग्य महाविद्यालयाची निवड करणे आणि विद्यार्थ्यांने ही या अभ्यासक्रमात रुची घेऊन मेहनत करणे आवश्यक आहे हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांची आवड आणि योग्यता समजून घेऊन त्याप्रमाणे  करिअरचे क्षेत्र निवडण्यात मदत केली आणि खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले तर प्रत्येक विद्यार्थी यशाचे शिखर गाठेल यात काही शंका नाही.
                                          
प्रा.अमित बनसोडे.
एस.व्ही.आय.टी कॉलेज
 सोलापूर.